प्रेम नको..
खरचं यार प्रेम बिम काही नको...
बस...आता सगळं पुरे झालं..
कोणासाठी तिष्ठणं नको...
आजवर झालेलं पुरे झालं..
डोळ्यांत दाटलेलं पाणी नको..
अन आभाळात ओघळता मेघ नको
रात्र रात्र जागणं नको...
त्याच जुन्या पायवाटांवर चालणं नको..
बस...आता सगळं पुरे झालं..
आता प्रेम बिम काही नको...
उगाचच लिहीणं काहीही...निरर्थक..
उगाचचं वाचणं...तेच...पुन्हा पुन्हा..
आता ह्यातलं.. काहीच नको
बस...बस..मी अन मीच..
बाकी प्रेम बिम काहीच नको
Monday, June 6, 2011
प्रेम नको..
प्रत्येक क्षण
झ्या बरोबर घालवलेला प्रत्येक क्षण एका आयुष्याएवढा वाटतो ....
तू हरवशील या भीतीने माझा प्रत्येक श्वास शरीरात येतानाच घाबरतो ....
तुला केलेला प्रत्येक फ़ोन म्हणजे माझ्यासाठी सुखाची पर्वणी असतो ....
फ़ोन मधून पण तुझ्या शरीराचा गंध माझ्या नाकात जावून बसतो .....
तुला केलेला प्रत्येक SMS म्हणजे माझ्यासाठी एक पवित्र ओवी असते ....
कितीही वेळा ती वाचली तरी मन भरत नसते .....
तुझी प्रत्येक भेट मला एक नवीन अनुभव देवून जाते ....
प्रत्येक भेटीनंतर तितकीच तू माझ्या मनात खोल रुजत जातेस ...
तुझ्याशिवाय
रहाण्याची कल्पना करवत नाही ... तुझ्याशिवाय राहण्यासाठी मन धजावत नाही ..
.का इश्वाराने ही वेळ आपल्यावर आणावी .... इतके प्रेम असून पण एकत्र
रहाण्याची मुभा नसावी
किती क्षणाचं आयुष्य असत
किती क्षणाचं आयुष्य असत ,
आज असत तर उद्या नसत,
म्हणूनच ते हसत हसत जगायचं असत ,
कारण इथ कोणी कुणाच नसत
साजन दिसावा
स्वप्नी माझ्या मज साजन दिसावा.
खोडी काढून गोड गाली हसावा.
धरेन तयासी मग लटका रुसवा.
जाईन दूर टाकून कटाक्ष फसवा.
भ्रमरापरी तो येईल मागुन.
लपेन मी फुल अन वेलीं मधुन.
घमघमेल चारी बाजुनी गंध.
हळुच मागुन नयन करेल बंद
उगा-उगा झोंबेन सोडवण्या मज.
सर्वांगातून झंकारेल मधुरसा साज.
वाटे मज हृदयाशी घट्ट तयाने धरावे.
ओठांनी अमृताचे प्याले रिते करावे.
तनु तयाच्या सदा विळख्यात रहावी.
अजंठाची ती युगुल मूर्तच भासावी.
क्षणा- क्षणाचे एकेक युग व्हावं.
प्राण प्रियाचं स्वप्न आता सत्यात यावं.
प्राण प्रियाचं स्वप्न आता सत्यात यावं.
मी चंद्र-तारे
मी चंद्र-तारे आणायच्या गोष्टी करत नाही,
डाळ-तांदूळ आणता आले, खूप झालं!
तू नाही दिसत ऐश्वर्यासारखी! हरकत नाही,
पण एकदम आवडलीस, खूप झालं!
काचेचं शमादान मी नाही लावू शकत छताला,
पावलापुरता प्रकाश येतोय,खूप झालं!
नको करूस पक्वान्न पंचतारांकीत हॉटेलमधली,
दोन वेळचं रांधता येतं तुला? खूप झालं!
मला नाही जमणार तुला न्यायला लॉंग ड्राईव्हला,
ऑफिसपर्यंत सोडता आलं, खूप झालं!
तुला नाही समजली माझी कविता? चालेल!
हिशोब समजतोय ना? खूप झालं!
नसू आपण रोमिओ-ज्युलिएट, वा नसू शिरी-फरहाद,
दोन श्वास, एक प्राण? खूप झालं!
असाव कुणीतरी
असाव कुणीतरी…..तुज़्यामधे मी हरवले म्हननारी…..
असाव कुणीतरी…..तुज़्यामधे मी हरवले म्हननारी…..
असाव कुणीतरी…..
सकाळी साखरझोपेतुन उठवणारी,
आणी तो चेहरा बघुन माजी क्षणात झोप उडावी….
असाव कुणीतरी…..
प्रेमाने सकाळी चहा करून देणारी ,
आणी केविल्वान्य डोळ्यानी माज़कडे पाहत राहणारी…..
असाव कुणीतरी…..
मी जवळ नसताना माज्या सोबत घालवलेल्या,
प्रतेक क्षणाची आठवण काढत राहणारी…..
असाव कुणीतरी…..
माजा वेडेपना पाहून गालातल्या गालात हसणारं,
आणी शब्दांना कानात साठवुन गोड प्रतिसाद देणारी…..
असाव कुणीतरी…..
भरलेच जर डोळे कधी माजे,
तर ओल्या असवांना पुसनारी…..
असाव कुणीतरी…..
माज्या मनात रमनारी,
अंधारलेल्या वाटेत माज्याबरोबर येणारी…..
असाव कुणीतरी…..
पलिकडील किना-यावरून माजी वाट पाहणारी,
उशीर जाला म्हणुन उदास आणी बेचैन होणारी ……
असाव कुणीतरी…..
असाव कुणीतरी…..तुज़्यामधे मी हरवले म्हननारी…